शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

अपुºया कर्मचाºयांवर पोलीस ठाण्यांचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:26 IST

जयसिंगपूर : ग्रामीण व शहरी भागात शांतता राखणे, नागरिकांची मालमत्ता व सुरक्षिततेची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे.

ठळक मुद्देशिरोळ तालुक्यातील चित्रअनेक वर्षांपासून अनुशेष बाकी,सुरक्षा व्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवरती

संदीप बावचे ।जयसिंगपूर : ग्रामीण व शहरी भागात शांतता राखणे, नागरिकांची मालमत्ता व सुरक्षिततेची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे. सणासुदीचे दिवस असले तरी चोखपणे कर्तव्य बजावणी करावी लागते. पोलीस कर्मचाºयांवर यामुळे कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. मात्र, अनेक वर्षापासून तीच कर्मचाºयांची संख्या शिरोळ तालुक्यात अजूनही कायम आहे. ५४ गावांचा भार सुमारे १३५ अधिकारी व पोलिसांच्या खांद्यावर आहे. गावांची संख्या पाहता पोलीस कर्मचाºयांची संख्या वाढविण्याची गरज आहे.

शिरोळ तालुक्यात जयसिंगपूर, शिरोळ व कुरुंदवाड ही तीन पोलीस ठाणी असून, नृसिंहवाडी येथे पोलीस चौकी आहे. जयसिंगपूर येथे उपविभागीय कार्यालय असून, शिरोळ पोलीस ठाण्याकडे एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, जयसिंगपूरकडे एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक, तर कुरुंदवाड पोलीस ठाण्याकडे एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक असे अधिकारी असून तीनही पोलीस ठाण्यांतर्गत एकूण १३५ पोलीस कर्मचाºयांची संख्या आहे.

प्रतिनियुक्ती, पोलीस बंदोबस्त, गार्ड बंदोबस्त याशिवाय साप्ताहिक सुट्ट्या यामुळे पोलीस ठाण्याकडे कार्यरत असणाºया कर्मचाºयांची संख्या पाहता ती अपुरीच आहे. दिवसेंदिवस शहरी व ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या, वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे याशिवाय ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणुका, महाविद्यालयीन व शालांत परीक्षा, मतदान केंद्रासह येणारे सण आणि लोकप्रतिनिधींचे कार्यक्रम येथे सुरक्षा व्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवरती असते. ही जबाबदारी पार पाडताना कर्मचारी संख्या कमी असल्याने कामाचा अतिरिक्त ताण येतो.दिवाळी असो की दसरा, नवरात्र असो की गणेशोत्सव, ईद असो की मोहरम पोलीस प्रशासन सर्वसामान्यांच्या सेवेत असतात. मोठमोठे सण त्यांना आपल्या परिवारातील सदस्यांसोबत साजरे करावयास मिळत नाहीत. गृहविभागाच्या दुर्लक्षामुळेच अनुशेष भरला जात नसल्याचे चित्र आहे. पोलीस प्रशासनाच्या अनेक समस्यांकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.नवीन निवासस्थानांची गरजजयसिंगपूर येथील पोलीस निवासस्थानाच्या इमारतींची दुरवस्था असतानाही अनेक कुटुंबे येथे राहात आहेत. अनेक समस्यातून पोलीस कर्मचाºयांना मार्ग काढावा लागत आहे. निवासस्थाने आहेत की खुराडी, असा प्रश्न त्यांना पडतो. शहरांचा विस्तार वाढला मात्र कर्मचाºयांची निवासस्थाने वाढली नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे नवीन निवासस्थाने उभारण्याची गरज बनली आहे. कुरुंदवाडमध्येही निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे.

टॅग्स :Policeपोलिस